मुंबई : आजपासून पितृपक्षाला (Pitru Paksha 2023) सुरुवात होत आहे. 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येपर्यंत श्राद्धविधी केले जातील. या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते, त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. पूर्वजांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत, त्यांना शाप मिळतो, असे मानले जाते. यामुळे त्यांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. जर पितरांच्या शाप लागला तर संतती सुखातही बाधा येते. यामुळे आज आपण पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घेणार आहे…
पितृ पक्षामध्ये काय करावे?
1. पितृ पक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते.
2. जर तुम्ही पितृ पक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण (पिंडदान वैगेर) अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागेल.
3. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात.
4. पितृ पक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात.
5. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या. असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते.
6. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11.30 ते 02.30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुप मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात.
7. पितृ पक्षामध्ये पूर्वजांची देवता अर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात, असे मानले जाते.
पितृ पक्षात काय करू नये?
1. पितृ पक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. ते निषिद्ध आहे.
2. या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. पितृदोष होऊ शकतो.
3. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल, उटणे इत्यादींचा वापर करण्यास मनाई आहे.
4. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की जावळ, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृ पक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे.
5. काही लोक पितृ पक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. टॉप न्यूज मराठी याची कोणतीही हमी देत नाही)