मीठ हे आपल्या जीवनावश्य्क वास्तूमधले एक मानले जाते. तसेच काचेच्या बरणीत मीठ भरून घराच्या कोपर्यात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. राहू, केतूची दशा सुरू असल्यास हा प्रयोग केल्यास तो अत्यंत लाभदायक ठरतो.
मिठाचे खडे लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य दाराला बांधल्याने घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाहीत. रात्री झोपण्याच्या वेळेस पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून हात पाय धुण्याने ताण दूर होतो आणि चांगली झोप येते.
वास्तु विज्ञानानुसार मीठ हे कौटुंबिक जीवनात आपसात मिळून-जुळून राहण्यात तसेच सुख समृद्धी वाढवण्यात सहायक असतं. हे मीठ काचेच्या बॉऊलमध्ये भरून शौचालय आणि स्नान गृहात ठेवावे याने वास्तुदोष दूर होण्यास मदत होते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. Top News मराठी याचे कसलेही समर्थन करत नाही.)