Indian Passport

Indian Passport: भारतात ‘या’ 3 रंगाचे पासपोर्ट वापरले जातात; जाणून घ्या प्रत्येक पासपोर्टचे महत्व

2176 0

मुंबई : आपल्या देशात पासपोर्ट (Indian Passport) हा एक महत्त्वाचा डॉक्यूमेंट मानला जातो. या पासपोर्ट (Indian Passport) शिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. ते देशात ओळखपत्र म्हणूनदेखील वापरले जाते. भारतातील पासपोर्ट केवळ निळेच नाही तर इतरही काही रंगांचे असतात. यामध्ये प्रत्येक रंगाच्या पासपोर्टची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. भारतीय पासपोर्ट लाल, पांढरा आणि निळा रंगाचा आहे. पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात आणि ते वेगवेगळ्या रंगात का बनवले जातात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना चला तर मग आज आपण या 3 रंगाच्या पासपोर्टबद्दल जाणून घेऊया…

Uniform Civil Code : समान नागरी कायदा आणणे इंग्रजांनादेखील जमले नव्हते

1) निळ्या रंगाचे पासपोर्ट
निळ्या रंगाचा पासपोर्ट सर्वसामान्यांसाठी जारी केला जातो. हे असल्यास, तुम्ही परदेशात जाऊन प्रवास करू शकता. यासोबतच या पासपोर्टवर काम, शिक्षण, आरोग्य आदी कोणत्याही कामासाठी परमिट घेतली जाऊ शकते.

2) पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट
पांढऱ्या रंगाच्या पासपोर्ट काही सरकारी कामासाठी परदेशात जाणार्‍या व्यक्तीला दिला जातो. या पासपोर्टवर विशेषाधिकार आहेत. जर तो पासपोर्ट असेल, तर त्याचा अर्थ असा होऊ शकतो की तो सरकारी अधिकारी आहे.

Headphones VS Earphones : हेडफोन की ईयरफोन काय आहे अधिक सुरक्षित ?

3) मरून रंगाचा पासपोर्ट
हा पासपोर्ट डिप्‍लोमेट्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला जातो. हा पासपोर्ट असणे म्हणजे तुम्हाला परदेशात जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. इमिग्रेशन प्रोसेसही सहज होते. पासपोर्ट सरकारकडून जारी केला जातो.यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Share This News

Related Post

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील उत्तम मनुष्यबळ घडविण्यावर ‘सूर्यदत्त’चा भर

Posted by - June 7, 2024 0
पुणे : एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतर्फे (आकोही) सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझमला (एससीएचएमटीटी) ‘आकोही प्रेस्टिजीएस…

हे राम ! 75 वर्षानंतरही जपून ठेवली आहे FIR 68 ची मूळ प्रत; महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी उर्दूमध्ये लिहिलेल्या या FIR मध्ये नेमकं काय ?

Posted by - January 30, 2023 0
आज 30 जानेवारी आहे. अर्थात 75 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेची आठवण आजही भारताला आहेच. 30 जानेवारी 1948 रोजी राजधानी दिल्लीतील…

का नांदत नाही घरामध्ये सुख समृद्धी ? लक्ष द्या या 5 महत्वाच्या गोष्टींकडे

Posted by - October 1, 2022 0
अनेक वेळा घरात देवकार्य , स्वछता करून देखील घरात सातत्याने काहीतरी कुरबुर आणि लहान मोठे संकट ओढवत असते. मग नेहमी…

18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक;कशी असते निवडणूक प्रक्रिया ?

Posted by - June 12, 2022 0
  देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे.रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 रोजी भारताचे 14…

पुणे : जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण

Posted by - September 7, 2022 0
पुणे : शिक्षकांनी स्वीकारलेले काम प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून सेवभावनेने करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *