रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तीवरे ढवळवाडी या ठिकाणी घडली आहे. श्रेयस रवींद्र ढवळ (वय 17 वर्ष) (Shreyas Ravindra Dhawal) असे मृत तरुणाचे नाव आहे.
काय घडले नेमके?
श्रेयस हा रत्नागिरी येथे शिक्षण घेत होता. सध्या मे महिन्याची सुट्टी असल्याने तो गावी आला होता. यावेळी तो काजळी नदीवर (Kajli River) आंघोळ करण्यासाठी गेला होता. बुरंबी कोंडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. श्रेयस हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आपला एकुलता एक मुलगा गमावल्याने ढवळ कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रेयस हा अत्यंत मनमिळाऊ व हुशार विद्यार्थी होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंब-मित्र परिवारासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलिसांना (Sakharpa Police) मिळताच पोलीस कर्मचारी वैभव कांबळे (Police Constable Vaibhav Kamble) हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतदेह शवविच्छेदन करून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.