Sharad Pawar

शरद पवारांच्या एका फोनवर महाराष्ट्रातल्या विद्यार्थांचे वाचले प्राण; काय आहे नेमके प्रकरण?

511 0

पुणे : मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृहात घेराव घालून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवड समिती, नेते आणि कार्यकर्त्यांचा मान राखत आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.

एकीकडे हे सगळे घडत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम केले. मणिपूरमध्ये आदिवासींच्या दोन समुदायात एससी दर्जा मिळवण्यावरून हिंसाचार उसळला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सगळ्या हिंसाचारात मणिपूरमधील इंफाळ येथे शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील अडकले होते.

यादरम्यान “बाबा, हिंसाचार खूपच वाढलाय, सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. कोणत्याही क्षणी माझ्या हॉस्टेलवरही हल्ला होऊ शकतो. कदाचित हे माझे शेवटचे बोलणे असेल”, अशा भयंकर संवादाचा फोन इंफाळ येथील एका विद्यार्थ्याने सांगलीतील जत तालुक्यात असणाऱ्या आवंडी गावात वडिल संभाजी कोडग यांना केला. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून वडील संभाजी यांना मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी मुलाला सुखरूप वाचवण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मदत मागितली. यानंतर शरद पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मणिपूरच्या राज्यपालांना फोन केला. यानंतर तातडीने सूत्र हलण्यास सुरुवात झाली. यानंतर महाराष्ट्रातील दहा व इतर राज्यातील दोन असे बारा विद्यार्थी आय.आय.टी. (IIIT) इंफाळ,मनिपूर होस्टेलमधून आपल्या घरी सुखरूप परतले.

Share This News

Related Post

पुणे महापालिकेची धडक कारवाई, थकबाकी असलेली 59 दुकाने केली सील

Posted by - May 7, 2022 0
पुणे – पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. आता महानगरपालिकेने सुमारे आठवडाभरात थकबाकी वसुलीसाठी व्यावसायिक हेतूने भाडेतत्त्वावर दिलेली…
Buldhana News

Buldhana News : मित्रांसोबत पिकनिकला गेला आणि जीवानिशी मुकला

Posted by - August 8, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) संग्रामपूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र…

आषाढी एकादशीच्या दिवशी ‘असे’ करा व्रत,नक्कीच होईल फलप्राप्ती

Posted by - July 8, 2022 0
आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच ‘आषाढी एकादशी’चे महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे.आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी,देवपोधी एकादशी,महाएकादशी,हरिशयनी एकादशी या नावाने…

यंदाच्या वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष अत्याधुनिक सोयीसुविधा; महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

Posted by - June 19, 2022 0
आगामी पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा…

जागतिक नेत्रदान नेत्रदान दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

Posted by - June 10, 2022 0
पुणे- जागतिक नेत्रदान नेत्रदान दिनाच्या पूर्वसंध्येला भोई प्रतिष्ठानच्या वतीने आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचारी बांधव आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *