#MAHARASHTRA POLITICS : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल ; म्हणाले, “शिवसेना एकच दुसरी मी मानत नाही…!” वाचा सविस्तर

641 0

मोठ्या संख्येने आलात त्यासाठी धन्यवाद. पत्रकार परिषद ही जनतेला माहिती देण्याचे माध्यम. गेली सहा महिने शिवसेनेचे काय होणार ? गद्दारांचे काय होणार ? सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ पासून नियमित होणार आहे. निवडणुक आयोगाची सुनावणी पूर्ण झालीय. शिवसेना एकच दुसरी मी मानत नाही. नसल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, आम्ही आमचे मुद्दे मांडलेले आहेत. त्याचसाठी आज पत्रकार परिषद. आमच्या शिवसैनिकांत संभ्रम. पक्ष जर केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी वर अवलंबून असू शकत नाही. अस असेल तर कोणी पण लोकप्रतिनिधी विकत घेईल.

 

निवडणुक आयोगाला निवडणुक घेण्याची परवानगी मागितली. त्यावर अद्याप निर्णय नाही.ती मिळाल्यावर घेऊ. शिवसेनाप्रमुख पद तसच ठेऊन पक्षप्रमुख पद स्वीकारले. मुख्य नेता असे शिवसेनेत पद नाही. गद्दारांनी शिवसेनेची घटना मान्य नाही असे मागेच सांगितले आहे. लाखांच्या घरात प्रतिज्ञापत्र आम्ही दिलेले आहेत. गद्दारांचा दावा हास्यास्पद. इतके दिवस निकालास लागायची गरजच नव्हती. आम्ही सगळ्या कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. पक्षांतर्गत लोकशाही प्रमाणेच शिवसेना निवडणुका घेतो. २० जूनला पक्षादेश मोडला. काही परत आले. गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा नीचपणाचा कळस.

जुलै महिन्यात ह्यांनी निवडणुक आयोगात शिवसेनेवर केला. घटनातज्ज्ञांनी पण आपल्या बाजूने मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली निघेस्तोवर निवडणुक आयोगाने घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा निकाल लवकर लागावा ही अपेक्षा. लोकशाहीच्या दृष्टीने अपात्रतेचा मुद्दा, विधीमंडळ पक्ष म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे. अशाने पैशांचा जोरावर कुणीही पंतप्रधान, मुख्यमंत्री होईल. या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल अशी अपेक्षा. अपात्रतेचा मुद्दा अगोदर निकाली निघायला हवा असे आमचे मत आहे. आमचा लोकशाही, न्यायालयावर संपूर्ण विश्वास. आमची बाजू भक्कम. धनुष्यबाण का गोठावला, गद्दारांनी अद्याप कुठलीच निवडणुक लढवलेली नाही. मग निवडणुक आयोगाने इतकी घाई का केली?

१६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता. निवडणुक आयोगाने काय करावे असे आम्हाला सांगायचे नाही. ही माहिती जनतेच्या मनातला संभ्रम दूर व्हावा या हेतूने दिलेली आहे. संख्या, प्रतिज्ञापत्र आम्ही दिलेले आहे. एकतर्फी निकाल द्यायचा असता तर निवडणुक आयोगाने अगोदरच निकाल दिला असता. आम्ही न्यायालयाला विनंती केली होती, परंतु न्यायालयाने निवडणुक आयोग स्वतंत्र संस्था असल्याचे सांगत निवडणुक आयोगाने निकाल दिल्यास त्याला आव्हान देता येईल. अनिल देसाईंना आम्ही निवडणुक आयुक्तच म्हणतो. अनिल देसाई याबाबत सगळी प्रक्रिया बघताहेत.

आम्ही सगळी प्रक्रिया निवडणुक आयोगाला कळवूनच आजवर शिवसेनेतील निवडणुका. यावर वेळकाढूपणा करायचा कारण गद्दारांची घटना आणि पक्षच नाही. ते तेव्हा भाजपात जाऊ शकत होते. आता ते पण कठीण झाले आहे. भाजपने त्यांना लटकावून ठेवले म्हणून वेळकाढूपणा गद्दारांकडून सुरु आहे, आणि हास्यास्पद मुद्दे ते समोर करताहेत आम्ही केलेल्या सर्व प्रक्रिया निवडणुक आयोगाला सादर केलेले आहेत.

शिवसेनेची घटना अयोग्य आहे हा दावाच चुकीचा. पक्षाची निवडणुक होण्यागोदर निवडणुक निर्णय अधिकारी नियुक्त होतात. पदांसाठी उमेदवारीचे अर्ज मागवला जातात. एकच अर्ज आल्यावर तसे निवडणुक आयोगाला कळवल्या जातात. त्यानंतर प्रस्ताव, अनुमोदक सर्व कायदेशीर, लोकशाही प्रक्रिया पार पाडून पक्षांतर्गत निवडणुक घेतल्या जाते. निवडणुक आयोगाला ह्या सर्व प्रक्रियेची माहिती आणि त्यावर निवडणुक आयोगाने त्यावर आजवर शिक्कामोर्तब वेळोवेळी केले आहे. निवडणुक आयोगात आजवरची सगळी माहिती आहे.

Share This News

Related Post

Akola News

Akola News : रागावून माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्यामुळे पतीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Posted by - August 18, 2023 0
अकोला : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली आहे. मूर्तिजापुरच्या…

दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने विजेतेपद पटकावले !!

Posted by - January 16, 2023 0
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘पुनित…

…तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ )

Posted by - January 24, 2022 0
मुंबई- बाबरीनंतर उत्तर हिंदुस्थानात शिवसेनेची एक लहर होती. उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या असत्या तर देशात…

भाजप आमदार गणेश नाईक यांचा पोलिसांकडून शोध, अटकेची टांगती तलवार

Posted by - April 20, 2022 0
नवी मुंबई- भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यावरून नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…

NITIN GADAKARI : 15 वर्षे उलटून गेलेल्या नऊ लाख जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार ! एक एप्रिल पासून…

Posted by - January 30, 2023 0
महाराष्ट्र : केंद्र आणि राज्य सरकारच्या आखत्यारितील 15 वर्षापेक्षा जास्त जुन्या गाड्या रस्त्यावरून हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *