मोठी बातमी : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मध्यस्थी; 14 डिसेंबरला होणार महत्त्वाची चर्चा

284 0

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मोठ्या प्रमाणावर चिघळल्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली. यावर आता केंद्रानेच मध्यस्थी करावी अशी मागणी महाराष्ट्राच्या खासदारांनी केली. कर्नाटक कडून सातत्याने उगारल्या जाणाऱ्या आक्रमक पवित्र्यामुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण तापले असतानाच, आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामध्ये मध्यस्थी करणार आहेत अशी माहिती मिळते आहे.

14 डिसेंबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी अमित शहा स्वतः चर्चा करणार आहेत. त्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील ते चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

See the source image

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर अमित शहा यांनी या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना कर्नाटक सरकारकडून मात्र आडमुठे धोरण अवलंबले जात आहे. कर्नाटक सरकारच्या या हेखेखोर भूमिकेबाबत देखील स्वतः अमित शहा कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करतील असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

” अमृता फडणवीस..,चितळे यांच्या बद्दल उपमुख्यमंत्री कधीही का बोलत नाहीत? ” सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

Posted by - January 3, 2023 0
पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई यांच्या नायगाव जन्मगावी आज अनेकांनी हजेरी लावून अभिवादन केले. पुण्यातील अभिवादन कार्यक्रमासाठी…

Big Breaking ! औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव ! कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- ठाकरे सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी मिळाली आहे. शिवसेनेचे…

मेळघाट येथे दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 9, 2022 0
मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून…

धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक

Posted by - April 21, 2022 0
इंदूर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिला अटक करण्यात…

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा १८८३८ मतांनी विजय

Posted by - April 16, 2022 0
कोल्हापूर- शेवटपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी बाजी मारत भाजपच्या सत्यजित कदम यांचा १८८३८ मतांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *