अकलूज : अकलूजमध्ये एक अजब गजब लग्न पार पडले आहे.मुंबईच्या एका घरामध्ये जुळ्या मुलींनी जन्म घेतला. लहानाच्या मोठ्या सोबतच झाल्या. शाळा, खेळणे बागडणे आणि मोठ्या झाल्यानंतर त्यांची नोकरी सुद्धा एकाच ठिकाणी… सगळं काही एकत्रच ! त्यामुळे त्या दोघींना एकमेकांची इतकी सवय होती की त्यांनी अगदी जीवनाचा साथीदार देखील एकच निवडला. हो तुम्ही जे वाचताय ते अगदी खरं आहे.
तर घडलं असं की या जुळ्या बहिणींना एकमेकांची इतकी सवय होती की त्यांना एकमेकींपासून दूर जाणं मान्य नव्हतं. या जुळ्या बहिणी आहेत रिंकी आणि पिंकी… अंधेरीमध्ये राहणाऱ्या या जुळ्या बहिणी अगदी उच्चशिक्षित आणि आयटीमध्ये जॉब करणा-या आहेत. आपल्या आईसोबत त्या राहतात. एक दिवस या तिघी आजारी पडल्या. घरामध्ये पुरुष माणूस नसल्याकारणाने अतुल नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरने आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी मदत केली. आणि त्यानंतर त्याची सुश्रुषा देखील केली.
यामुळे यातील एका बहिणीला अतुलवर प्रेम जडले. पण त्या दोघींनाही एकमेकींपासून दूर राहणं मान्य नव्हत. त्यामुळे दोघीनी हा अजब निर्णय घेतला. आणि अतुलच्या गळ्यात दोघींनी वरमाला घातली. हा विवाह पार पडला, मोठ्या प्रमाणावर या विवाहाची चर्चा देखील झाली. पण आता नवरदेवाच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. आता पुढे या नवरदेवावर काय कारवाई होणार हे लवकर समजेल. पण यांच्या या भन्नाट निर्णयासमोर युजरनेदेखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्हाला एक बायको मिळेना १ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.