‘पुष्पा’ चित्रपटात दाखवण्यात आलेल्या रक्तचंदनाची खरी कहाणी, काय आहे रक्तचंदन ?

872 0

दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘ पुष्पा: द राइज ‘ हा चित्रपट सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाची कथा ही तितकी वाखणण्याजोगी आहे. कथेत ‘ पुष्पा ‘ नावाचा एक मजूर चंदन तस्करीच्या व्यवसायात उतरतो. तो हळूहळू या व्यवसायात इतका प्रवेश करतो की त्याला काही काळात करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही कथा काल्पनिक असली तरीही या चित्रपटात दर्शवलेल्या रक्तचंदनाबद्दल जवळजवळ सर्व काही खरं आहे. भारतात रक्तचंदन हे एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. त्याला लाल सोनंही बोललं जातं.

भारतातील या ‘ रेड गोल्ड ‘ चा इतिहास जाणून घ्या

रक्तचंदनाची झाडे आंध्रप्रदेश राज्य सोडून इतर कुठेही येत नाहीत. तामिळनाडूच्या सीमेला लागून असलेल्या आंध्रप्रदेशातील फक्त 4 जिल्ह्यांमध्ये लाल चंदनाचे लाकूड उपलब्ध होते. नेल्लोर, चित्तूर, कडप्पा आणि कुरनूलच्या शेषाचलम टेकड्यांमध्ये ही झाडं वाढतात. ही झाडे पाण्यात बुडू शकतात आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. रक्तचंदन सरासरी 8 ते 11 मीटर उंचीपर्यंत वाढतं.

भारतात रक्तचंदनाला खूप मागणी आहे. रक्तचंदनाचं झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे उदबत्तीपासून ते तिलकांपर्यंत याचा वापर केला जातो. रक्तचंदनाचे लाकूड तीन रंगात आढळते. पांढरा, लाल आणि पिवळा. पण रक्तचंदन म्हणजेच लाल लाकूड हे इतर दोन रंगीत लाकडांइतके सुगंधित नसते. त्याचं वैज्ञानिक नाव टेरोकार्पस सॅंटलिनस असं आहे. महागडे फर्निचर आणि सजावटीमध्ये वापरण्यात येत असल्यामुळे रक्त चंदनला नेहमीच जास्त मागणी असते. सौंदर्य वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो. वाईन बनवण्यासाठीही रक्तचंदनचा वापर होतो.

रक्तचंदनाच्या सुरक्षेसाठी एसटीएफ तैनात

या झाडांच्या संरक्षणासाठी एसटीएफ तैनात आहे.आता सोन्यासारखी महागडी वस्तू घनदाट जंगलात सापडली तर कोणाच्या डोळ्यांना ते पाहण्याचा मोह आवरणार नाही. त्यामुळे त्याची तस्करीही मोठ्या प्रमाणात होते. या सर्व बेकायदेशीर गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी ज्या भागात ही विशेष लाकडे आढळतात त्या ठिकाणी एसटीएफ विशेष तैनात करण्यात आली आहे. चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया असे अनेक देश आहेत जिथे या लाकडांना जास्त मागणी आहे. पण या जंगलांवर सर्वात जास्त चीनची नजर असते. त्याची तस्करीही या भागांत मोठ्या प्रमाणात होते. रक्तचंदनची तस्करी रोखण्यासाठी भारतात अनेक कडक कायदे आहेत. तरीही रस्ता, हवा, पाणी या तिन्ही मार्गांनी त्याची तस्करी होते. पकडलं जाऊ नये म्हणून काही वेळा त्याची पावडर स्वरूपात देखील तस्करी केली जाते. या कारणास्तव गेल्या काही वर्षांत या विशेष लाकडांची संख्या 50% टक्क्याने कमी झाली आहे. अनेकांना तस्करी करताना मोठी अटकही करण्यात आली आहे. तस्करी करताना पकडल्यास भारतात 11 वर्षांच्या कारावासाचीही तरतूद आहे.

Share This News

Related Post

GOURI KHAN

आर्यनच्या अटके प्रकरणी गौरी खान म्हणते ; “त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही”…! वाचा सविस्तर

Posted by - September 22, 2022 0
मुंबई : करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सातव्या सीजनमध्ये नुकतीच इंटेरियर डिझायनर आणि बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान…
Deepfake Technology

Deepfake Technology : रश्मिकानंतर आलिया भट्ट ‘डीपफेक’ची शिकार; Video व्हायरल

Posted by - November 25, 2023 0
मुंबई : आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे डीपफेक टेक्नॉलॉजी (Deepfake Technology). या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या…
Bharati Pawar

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Posted by - April 4, 2024 0
देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या दिंडोरीत महायुतीच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि…

रिपब्लिकन अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अब्दुल जलील शेख यांची निवड

Posted by - November 1, 2022 0
पुणे : अनेक अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी व वस्तू व सेवा कर विभागाचे माजी अधिक्षक अब्दुल जलील…

हृता दुर्गुळेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अनन्या’चा ट्रेलर प्रदर्शित, नवऱ्याने केले हृताचे कौतुक (व्हिडिओ)

Posted by - June 28, 2022 0
अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या ‘अनन्या’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा सिनेमा २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दरम्यान सिनेमाचा ट्रेलर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *