‘मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, आमदारांनाही सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत’ गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली नाराजी

405 0

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, संघटना सोडली, आपल्यासारखे आमदार सोडले पण ते शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत, असे वक्तव्य बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केले. आपण १०० टक्के शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने याठिकाणी पोहोचलो आहोत. मात्र या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आपली किमान २० टक्के मेहनत आहे असेही गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. एकूणच गुलाबराव पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, ” आपल्यावर सध्या आपापल्या मतदारसंघात आरोप आणि टीका होत आहे. मात्र, त्याचवेळी काही लोक आपल्या पाठिशी उभेही राहत आहेत. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन इकडे आलोय. आपल्यावर टीका करणाऱ्यांना आपला संघर्ष माहिती नाही. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेसाठी (Shivsena) खूप काही केले आहे”

संजय राऊत यांच्यावर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले, ” आमच्या वाटचालीत पक्षाचा वाटा असला तरी आमचीही मेहनत आहे. ही मेहनत संजय राऊत यांना कळणार नाही. आम्ही काय आयत्या बिळावर नागोबा नाहीत. पक्षासाठी केस कशी अंगावर घेतात हे राऊत यांना माहीत नाही, ते मी भोगलेलं आहे. पक्षाच्या कार्यकर्ते आणि जनतेसाठी आम्ही सतत काम करत असतो. सभागृहात उद्या आम्हीच शिवसेनेच्या बाकीच्यांना प्रत्युत्तर द्यायला पुरेसे आहोत, असेही गुलाबराव म्हणाले.

“संजय राऊत यांना ३०२ काय असते, दंगलीच्यावेळी काय परिस्थिती असते, हे माहिती नाही. हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्यक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत. संजय राऊत यांनी ४७ डिग्री तापमान असताना ३५ लग्नं लावून दाखवावती, मग मी त्यांना मानेन. रात्री १२ वाजता रक्ताची गरज पडते किंवा कार्यकर्त्यांना अडचणी येतात तेव्हा आमचा फोन सुरु असतो. त्यामुळे आपण परिस्थिती सांभाळून घेऊ. आपण एवढेच जण त्यांना सभागृहात पुरेसे आहोत” असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

‘संजय राऊत यांना चुना कसा लावतात हे माहित नाही. आता मी त्यांना ते दाखवून देईल’ असा टोला देखील गुलाबराव पाटील यांनी लगावला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईला येण्याचे वेध लागले आहेत. आज दुपारपर्यंत हे आमदार गुवाहाटीहून गोव्याला पोहोचतील.

Share This News

Related Post

पुण्यातील ही प्रसिद्ध पावसाळी पर्यटनस्थळे गेले नाही तर नक्की जा!

Posted by - July 15, 2022 0
पावसाळा म्हणलं की थंड हवेच्या ठिकाणी फिरायला पसंती दिली जाते. धबधबे, डोंगर, थंड हवा, रिमझिम पावसाच्या सरी अशा ठिकाणी पर्यटक…
Sanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांची नवनीत राणांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले ‘बाई तुम्हाला खुणावेल अन्…’,

Posted by - April 18, 2024 0
अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. प्रचारसभांमधून नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत दिसत आहेत. यादरम्यान टीका…

टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत

Posted by - August 8, 2022 0
पुणे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या…

बेळगाव महाराष्ट्राचं की कर्नाटकचं…? आज होणार फैसला ; मराठी भाषिकांचे लक्ष

Posted by - August 30, 2022 0
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सुरू असलेला बेळगाव, कारवार, निपाणी हा कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील करण्यासाठी अनेक वर्षांचा लढा सुरू…
Dhangar Reservation

Dhangar Reservation : जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांकडून दगडफेक

Posted by - November 21, 2023 0
जालना : जालन्यात धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) चाललेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. जालन्यात तुफान राडा पहायाला मिळत आहे. धनगर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *