जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी पर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी

138 0

नवी दिल्ली- आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये वायकॉम18 ग्रुपने तीन गटाचे अधिकार जिंकले आहेत. या लिलाव प्रक्रियेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक नीता अंबानी यांनी आयपीएल जगभरातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीपर्यंत पोहचवण्याचं मिशन असल्याचे सांगितले.

आयपीएलच्या 2023 ते 2027 या कालावधीसाठी सर्व कॅटेगरीची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. बीसीसीआयने यंदा चार ग्रुपमध्ये मीडिया हक्क विकण्याचा निर्णय घेतला होता. पहिला गट भारतातील टीव्ही मीडिया अधिकारांचा होता आणि यासाठी 23,575 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. दुसरा गट ओटीटी प्लॅटफॉर्मवर टेलिकास्ट अधिकारांचा होता आणि त्यासाठी 20,500 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.

तिसरा गट विशेष श्रेणीतील सामन्यासाठी होता, ज्यासाठी 3,258 कोटी रुपयांची बोली लावली गेला. तर, चौथा गट विदेशी प्रसारण हक्कांसाठी होता ज्यासाठी 1,057 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.

प्रसारण हक्कांसाठी लिलावप्रक्रिया नुकतीच पार पडली असून यातून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने (BCCI) तब्बल 48 हजार कोटी 390 रुपये मिळवले आहेत. टिव्ही आणि डिजिटलर हक्क वेगवेगळ्या कंपनीला मिळाले आहेत. स्टार स्पोर्ट्स ने आयपीएलचे टिव्ही हक्क आणि व्हायकॉम्18 समूहाने डिजिटल राइट्सचे हक्क मिळवले आहेत. त्याशिवाय वायकॉम18 ने स्पेशल कॅटेगरी राइट्स आणि वायकॉम18 आणि टाईम्स इंटरनेटनं परदेशी मीडिया अधिकार विकत घेतले आहेत.

नीता अंबानी यांनी बुधवारी वायकॉम18 च्या एका अधिकृत जाहिरातीच्या माध्यमातून आपला संदेश दिला. त्या म्हणाल्या की, ‘क्रीडा क्षेत्र आपले नेहमीच मनोरंजन करते. त्याशिवाय खेळातून आपल्याला प्रेरणा मिळते त्याशिवाय खेळामुळे आपण सर्वजण एकत्र येतो. क्रिकेट आणि आयपीएल हे सर्वक्षेष्ठ खेळ आहेत. ते जगात भारताचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळेच आयपीएल आणि क्रिकेटसोबत जोडलं गेल्यामुळे अभिमान वाटतोय. आयपीएल लीगला जगभरात प्रत्येक क्रीडा प्रेमीपर्यंत पोहचण्याचं आमचं मिशन आहे’

Share This News

Related Post

Ratnagiri News

Ratnagiri News : धक्कादायक ! वडिलांनी फटकारल्यामुळे तरुण मुलाने रागाच्या भरात उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 23, 2023 0
रत्नागिरी : रत्नागिरीमधील (Ratnagiri News) राजापूर तालुक्यात भू गावातील कुंभारवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने…

गृहिणींसाठी आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात प्रती लीटर 20 रुपयांची कपात

Posted by - June 17, 2022 0
नवी दिल्ली- वाढत्या महागाईच्या दरात सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत कपात झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्यात…

मोठी बातमी : परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्या दरम्यान गोंधळ

Posted by - December 13, 2022 0
परभणी : आज पुण्यामध्ये बंद पळून मूक मोर्चा काढण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी…

#CRIME : पत्नीला अद्दल घडवण्यासाठी तिच्या आईने दिलेल्या 44 लाखांची करवली चोरी; असा झाला उलगडा, मुंबईतील विचित्र घटना

Posted by - February 25, 2023 0
मुंबई : मुंबईच्या अंधेरी भागातून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 22 फेब्रुवारी रोजी भुलेश्वरला गेले…

Chandrakant Patil : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं

Posted by - November 26, 2022 0
पुणे : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *